Maratha Andolan : आज दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू, पावसाचा जोर वाढला

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आझाद मैदात त्यांचे हे आंदोलन सुरू असून पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आधी या आंदोलनासाठी फक्त शुक्रवारीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी शनिवारसाठी वाढवण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली.


दरम्यान, या आंदोलनासाठी काही कडक नियम तसेच अटी पोलिसांकडून लादण्यात आल्या आहेत. या आंदोलनासाठी सरकारने संख्या मर्यादा ठरवली आहे. ही मर्यादा ५ हजारांच्या आत ठेवावी अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी परिसरात गर्दी केली होती. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.



पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगताना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.

Comments
Add Comment

DJ company : डिजे वाजवणाऱ्या कंपनीला रस्त्यावरील रेलिंगचे कंत्राट

कुणाच्या दबावाखाली महापालिकेने दिले शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी उबाठाची केली बोलतीच बंद मुंबई (विशेष

NEET UG परीक्षेसाठी मेगाब्लॉकच्या नियोजनात बदल, जाणून घ्या कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक ?

मुंबई : नीट युजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकच्या

Night Block : कल्याण-बदलापूर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

कल्याण : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने कल्याण-बदलापूर दरम्यान १ ते ३ मेदरम्यान दोन रात्री विशेष पॉवर ब्लॉक जाहीर

Megablock : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेजर ब्लॉक

मुंबई : मुंबईतील मेट्रो ६ च्या स्टील गर्डर लाँचिंगच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २ आणि ३ मे च्या मध्यरात्री १०

Census In Mumbai : मुंबईत जनगणना-२०२७ला सुरुवात, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व-गणनेद्वारे केला मोहिमेचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganesh Khankar : पुढची २५ वर्षे आम्ही काय आता हटत नाही, खणकरांनी विरोधकांना सुनावले

सभागृहनेत्यांच्या गिनतीत विरोध पक्षनेत्या नाहीच, आझमींचाच घेतला समाचार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई