जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.  दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. त्यांनंतर आज एका दिवसासाठी ही मुदत वाढवून दिली होती. जी संध्याकाळी ६ वाजता संपली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली असल्याकारणामुळे तिसऱ्या दिवशीही मुंबईत जरांगे समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी जोवर मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत नाही, तोवर मुंबई सोडणार नसल्याचा एल्गार केला आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळो वा ना मिळो जरांगे जागेवरून हटणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रचंड ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे आज किंवा उद्या सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.



शिंदे समिती आणि जरांगेची भेटीत काय ठरले?  


कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.


दरम्यान, शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला.  मात्र जरांगे यांनी कोणताही प्रकारचा वेळ देण्यास थेट नकार दिला आहे. ते म्हणाले,  शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर हे आंदोलन कायम राहील.



सदावर्तेकडून जरांगेना अटक करण्याची मागणी


गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांनी अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास

BMC Schools : जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू खरेदीला विलंब नाही, महापालिका प्रशासनाने केली भूमिका स्पष्ट

वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार मुलांना दप्तरे द्या तब्बल दोन वर्षांतील ४३ कोटी रुपयांची झाली बचत मुंबई : मुंबई

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू