एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुलियाकुलम परिसरात असलेले ‘मुंधी विनायक मंदिर’ हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे. येथे तब्बल २० फूट उंच आणि १९० टन वजनाची गणेशाची भव्य मूर्ती एकाच दगडातून साकारण्यात आली आहे, जी आशियातील सर्वात मोठ्या गणेशमूर्तींपैकी एक मानली जाते.


या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील गणेशाची भव्य मूर्ती. ‘मुंधी विनायक’ या नावाचा अर्थ ‘प्रथम पूजनीय’ किंवा ‘अग्रगण्य’ असा होतो आणि ही मूर्ती आपल्या नावाला सार्थ ठरवते. ही संपूर्ण मूर्ती एकाच विशाल दगडातून कोरण्यात आली आहे, ज्यामुळे तिचे कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. मूर्तीची उंची १९ फूट १० इंच असून, वजन तब्बल १९० टन आहे. या मूर्तीची स्थापना १९८२ साली करण्यात आली. यासाठी लागणारा विशाल दगड इरोडजवळील ऊथुकुली नावाच्या गावातून आणण्यात आला होता. मुंधी विनायक मंदिर हे स्थानिक भाविकांसोबतच देशभरातील पर्यटकांसाठीही एक प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची रचना साधी असली, तरी प्रवेश करताच समोर दिसणारी गणेशाची भव्य मूर्ती प्रत्येकाला थक्क करते.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात