एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुलियाकुलम परिसरात असलेले ‘मुंधी विनायक मंदिर’ हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे. येथे तब्बल २० फूट उंच आणि १९० टन वजनाची गणेशाची भव्य मूर्ती एकाच दगडातून साकारण्यात आली आहे, जी आशियातील सर्वात मोठ्या गणेशमूर्तींपैकी एक मानली जाते.


या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील गणेशाची भव्य मूर्ती. ‘मुंधी विनायक’ या नावाचा अर्थ ‘प्रथम पूजनीय’ किंवा ‘अग्रगण्य’ असा होतो आणि ही मूर्ती आपल्या नावाला सार्थ ठरवते. ही संपूर्ण मूर्ती एकाच विशाल दगडातून कोरण्यात आली आहे, ज्यामुळे तिचे कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. मूर्तीची उंची १९ फूट १० इंच असून, वजन तब्बल १९० टन आहे. या मूर्तीची स्थापना १९८२ साली करण्यात आली. यासाठी लागणारा विशाल दगड इरोडजवळील ऊथुकुली नावाच्या गावातून आणण्यात आला होता. मुंधी विनायक मंदिर हे स्थानिक भाविकांसोबतच देशभरातील पर्यटकांसाठीही एक प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची रचना साधी असली, तरी प्रवेश करताच समोर दिसणारी गणेशाची भव्य मूर्ती प्रत्येकाला थक्क करते.

Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत