खेडमध्ये विसर्जनादरम्यान युवक बुडाला


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली. NDRF चे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. माहितीनुसार, मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक युवक नदीपत्रात उतरले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले. त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला. मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यात बुडाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, खेड शहरातील 'विसर्जन कट्टा पथक' तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.


दरम्यान, शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खेड तालुका प्रशासनानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला. विशेष म्हणजे, मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी असून त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करत असतानाच ही घटना घडली आहे. सध्या मंगेश पाटील यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत.


Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८