खेडमध्ये विसर्जनादरम्यान युवक बुडाला


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली. NDRF चे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. माहितीनुसार, मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक युवक नदीपत्रात उतरले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले. त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला. मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यात बुडाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, खेड शहरातील 'विसर्जन कट्टा पथक' तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.


दरम्यान, शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खेड तालुका प्रशासनानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला. विशेष म्हणजे, मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी असून त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करत असतानाच ही घटना घडली आहे. सध्या मंगेश पाटील यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत.


Comments
Add Comment

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या