जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मधील पदकाचे स्वप्न भंगले. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूला इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह सिंधूने स्पर्धेतून बाहेर पडली, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक सहावे जागतिक पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.


या सामन्यात कुसुमा वारदानीने सिंधूचा २१-१४, १३-२१, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. हा सामना १ तास ८ मिनिटे चालला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच कुसुमाने आक्रमक खेळ दाखवत पहिला गेम २१-१४ अशा फरकाने जिंकला.


दुसऱ्या गेममध्ये सिंधूने जोरदार पुनरागमन केले. तिने आपल्या आक्रमक खेळाने कुसुमाला बॅकफूटवर ढकलले. दमदार स्मॅश आणि नेटजवळच्या अचूक फटक्यांचा वापर करत तिने हा गेम २१-१३ असा सहज जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.


निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी संघर्ष केला. मात्र, कुसुमाने अखेरच्या क्षणी बाजी मारली. तिने सिंधूला मागे टाकत हा गेम २१-१६ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.


या पराभवामुळे सिंधूचे सहावे जागतिक पदक जिंकून इतिहास रचण्याचे स्वप्न तुटले. सिंधूने यापूर्वी २०१९ मध्ये सुवर्णपदक, २०१७ आणि २०१८ मध्ये रौप्यपदके, तर २०१३ आणि २०१४ मध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. या स्पर्धेतील सिंधूची कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी होती, विशेषतः तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग झी यीला उपांत्यपूर्व फेरीत हरवले होते.


सध्या, पुरुष दुहेरीमधील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारताची एकमेव जोडी स्पर्धेत कायम आहे. त्यांचे पदक जिंकण्याची आशा अजूनही जिवंत आहे.

Comments
Add Comment

Axar Patel : दिल्लीला मोठा धक्का ! अक्षर पटेलला झाला एवढा मोठा दंड

मुंबई : अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती, मात्र सलग पराभवांनंतर त्यांचे

South Africa : वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली मागे, टी- २० वर्ल्ड कप खेळणार

लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली, कोणत्या संघाला किती गुण पाहिजेत , जाणून घेऊया...

PlayOff Race : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने झाले आहेत. अद्याप एकही संघ

Tim David : टीम डेव्हिडवर बीसीसीआयची कठोर करवाई, हंगामातून बॅन होण्याची शक्यता !

BCCI ACTION : आयपीएल २०२६ मध्ये १० मे रोजी आरसीबी आणि मुंबईचा सामना झाला. या सामन्यात आरसीबीने अखेरच्या षटकात मुंबईचा २

SRH VS GT : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध गुजरातमध्ये रंगणार थरारक सामना ! निकालाचा परिणाम आरसीबीवर ...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये ५६ वा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स

IPL 2026 मध्ये वाढली Playoff ची चुरस

धरमशाला : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५४ साखळी सामने (लीग मॅच) झाले आहेत. धरमशाला येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब