Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. रविंद्र शंकर चिटणीस, अभिषेक रविंद्र चिटणीस यांनी घरच्या बाप्पासाठी 'माझ्या मराठीची गोडी' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.





या संकल्पनेतून त्यांनी एक छोटा संदेशसुद्धा पोहोचवला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली तरी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी झालेला लढा आणि त्यातील बलिदान आजही ताजे आहेत. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र आजही महाराष्ट्राचे काही प्रांत कर्नाटक आणि गुजरातकडे आहेत, हे वास्तव मराठी जनतेच्या मनाला सतत वेदना देत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परप्रांतीयांचा ओघ वाढल्याने स्वतःच्या मातृभाषेची ओळख जपण्यासाठी मराठी माणसालाच संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त केली जाते.



“महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं आणि मराठी टिकवायचं, अन्यथा महाराष्ट्र सोडायचं,” अशी ठाम भूमिका स्वाभिमानी मराठी तरुण मांडताना दिसत आहेत. मराठीच्या गतवैभवासाठी हा लढा अखेरपर्यंत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा लढा आणि मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण याचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी