Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. रविंद्र शंकर चिटणीस, अभिषेक रविंद्र चिटणीस यांनी घरच्या बाप्पासाठी 'माझ्या मराठीची गोडी' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.





या संकल्पनेतून त्यांनी एक छोटा संदेशसुद्धा पोहोचवला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली तरी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी झालेला लढा आणि त्यातील बलिदान आजही ताजे आहेत. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र आजही महाराष्ट्राचे काही प्रांत कर्नाटक आणि गुजरातकडे आहेत, हे वास्तव मराठी जनतेच्या मनाला सतत वेदना देत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परप्रांतीयांचा ओघ वाढल्याने स्वतःच्या मातृभाषेची ओळख जपण्यासाठी मराठी माणसालाच संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त केली जाते.



“महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं आणि मराठी टिकवायचं, अन्यथा महाराष्ट्र सोडायचं,” अशी ठाम भूमिका स्वाभिमानी मराठी तरुण मांडताना दिसत आहेत. मराठीच्या गतवैभवासाठी हा लढा अखेरपर्यंत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा लढा आणि मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण याचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग