Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. रविंद्र शंकर चिटणीस, अभिषेक रविंद्र चिटणीस यांनी घरच्या बाप्पासाठी 'माझ्या मराठीची गोडी' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.





या संकल्पनेतून त्यांनी एक छोटा संदेशसुद्धा पोहोचवला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली तरी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी झालेला लढा आणि त्यातील बलिदान आजही ताजे आहेत. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र आजही महाराष्ट्राचे काही प्रांत कर्नाटक आणि गुजरातकडे आहेत, हे वास्तव मराठी जनतेच्या मनाला सतत वेदना देत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परप्रांतीयांचा ओघ वाढल्याने स्वतःच्या मातृभाषेची ओळख जपण्यासाठी मराठी माणसालाच संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त केली जाते.



“महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं आणि मराठी टिकवायचं, अन्यथा महाराष्ट्र सोडायचं,” अशी ठाम भूमिका स्वाभिमानी मराठी तरुण मांडताना दिसत आहेत. मराठीच्या गतवैभवासाठी हा लढा अखेरपर्यंत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा लढा आणि मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण याचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ : परिमंडळनिहाय सर्वोत्तम कोणती ठरली नैसर्गिक, कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळे

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदाचा श्रीगणेशोत्सव गणेशभक्तांसोबतच प्रशासनासाठी देखील वेगळा होता. पर्यावरणपूरक

पवईमध्ये कार अपघातात मजुराचा मृत्यू, अपघातानंतर निवृत्त अधिकाऱ्याने दाखवली माणुसकी

मुंबई: पवई पोलिसांनी एका ७४ वर्षीय निवृत्त संरक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

सॅमसंगचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच

मुंबई : कोरियन टेक दिग्गज सॅमसंगने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एम-सिरीज अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन

मशिदीवरील भोंग्यामुळे गुन्हा दाखल! 'अजान'साठी स्पीकर वापरणाऱ्या दोघांवर कारवाई

मुंबई: पश्चिम उपनगरातील एका मशिदीत 'अजान' (प्रार्थनेसाठी आवाहन) देण्यासाठी भोंग्याचा (लाउडस्पीकर) वापर