डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सनी कुमार चौधरी, गिरधारी रॉय आणि मृत्युंजय झा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केशव चौधरी, असे मृत तरुणाचे नाव आहे. केशव मूळचा बिहारचा, दोन आठवड्यांपूर्वी नोकरीसाठी तो त्याचा मामा मृत्युंजय झा याच्यासोबत राहत होता. माझगावमधील एका इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. केशवच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय हे देखील याच परिसरात राहायला होते. सोमवारी रात्री, केशव त्याचा मामा, सनी आणि गिरधारी यांच्यासोबत दारू पित असताना गावातील जमिनीवरून त्यांच्यात वाद झाला. मद्यधुंद अवस्थेतील मृत्युंजय आणि त्याच्या दोन मित्रांनी केशववर हल्ला केला. मृत्युंजयने केशवच्या मानेवर पाय ठेवून त्याचा गळा दाबला, केशवचा जागीच मृत्यू झाला. तिघांनी मिळून केशवचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टँकमध्ये टाकला. सनी आणि गिरधारी भुसावळला पळून गेले. मृत्युंजय मुंबईतच होता पोलीसी चौकशीत पोलिसांना मृत्युंजयवर संशय आला. चौकशीत मृत्युंजयने गुन्हा कबुल केला. गुन्हे शाखा युनिट ३ ने इतर दोन आरोपींना भुसावळ येथून मुंबईला आणले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस