ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या ‘कला’ या पात्राचा अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. मात्र कला-अद्वैत या जोडीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का ठरला आणि त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता या मालिकेच्या चाहत्यांवर आणखी एक धक्का येऊ शकतो, कारण अवघ्या काही दिवसांत नवीन मालिका सुरू होत असून तिला ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा टाइम स्लॉट देण्यात आला आहे.


सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते. मात्र पुढील महिन्यापासून या वेळेत ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका दाखवली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून ही नवी मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी तिचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ कायमस्वरूपी बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलली जाणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


दरम्यान ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ यांची जोडी दिसणार आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असून अभिनेते मिलिंद गवळी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतील. न्यायासाठी लढणाऱ्या ऊर्जाच्या संघर्षाची कोर्टरूम ड्रामा शैलीतील ही कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.


ईशा केसकरने मालिका का सोडली?


ईशाने मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण तब्येतीचे असल्याचे स्पष्ट केले. सलग दोन वर्षे काम करत असताना तिच्या डोळ्याला फोड आला होता, तरीही ती शूटिंग करत होती. मात्र दुखापत वाढल्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे सांगण्यात आले. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच तिने टीमला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

Comments
Add Comment

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने

Deool Band 2 Box Office Collection : 'देऊळ बंद २'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; प्रवीण तरडेंचा सिनेमा सुपरहिटच्या दिशेने, सर्व थिएटरमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर!

मुंबई : प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट 'देऊळ बंद २'(Deool Band 2) २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक