ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या ‘कला’ या पात्राचा अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. मात्र कला-अद्वैत या जोडीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का ठरला आणि त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता या मालिकेच्या चाहत्यांवर आणखी एक धक्का येऊ शकतो, कारण अवघ्या काही दिवसांत नवीन मालिका सुरू होत असून तिला ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा टाइम स्लॉट देण्यात आला आहे.


सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते. मात्र पुढील महिन्यापासून या वेळेत ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका दाखवली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून ही नवी मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी तिचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ कायमस्वरूपी बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलली जाणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


दरम्यान ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ यांची जोडी दिसणार आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असून अभिनेते मिलिंद गवळी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतील. न्यायासाठी लढणाऱ्या ऊर्जाच्या संघर्षाची कोर्टरूम ड्रामा शैलीतील ही कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.


ईशा केसकरने मालिका का सोडली?


ईशाने मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण तब्येतीचे असल्याचे स्पष्ट केले. सलग दोन वर्षे काम करत असताना तिच्या डोळ्याला फोड आला होता, तरीही ती शूटिंग करत होती. मात्र दुखापत वाढल्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे सांगण्यात आले. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच तिने टीमला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

Comments
Add Comment

Rohit Shetty : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी आगऱ्यातून अटकेत

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या

Sapne Vs Everyone : प्राइम व्हिडिओने ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नवीन सीझनची जागतिक रिलीज डेट १ मे ठरवली

महत्त्वाकांक्षा आणि बदला यावर आधारित एक रोमांचक ड्रामा मुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय एंटरटेनमेंट

Bigg Boss Marathi 6 : ग्रँड फिनाले सोहळा १९ एप्रिल रोजी

मुंबई : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार. आता

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल