मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघात पाच गोलंदाजांना स्थान दिले असून त्यापैकी तीन वेगवान आहेत. ज्यांचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल. मात्र, शमीला १५ सदस्यीय मुख्य संघात सोडून द्या, त्याला राखीव खेळाडूंच्या यादीतही समाविष्ट केलेले नाही. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेद्वारे शमीने तीन वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते. याआधी त्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात त्याचा शेवटचा सामना खेळला होता. पुनरागमनाच्या पहिल्या सामन्यात (राजकोट) शमीला विकेट मिळाली नाही, मात्र वानखेडे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने तीन बळी घेतले होते.

पाकिस्तानविरुद्ध खेळणे इतर संघांविरुद्ध खेळण्यापेक्षा वेगळे आहे का? किंवा तो एक सामान्य सामना मानला जातो का? असे विचारले असता शमीने, ‘तो अनुभव खरोखरच वेगळा आहे’ असे सांगितले. शमीला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, 'काही लोक मला मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य करतात, विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर. पण मला त्याची पर्वा नाही, कारण मी काही यंत्र (मशीन) नाही. चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील. जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळतो, तेव्हा माझे लक्ष्य विकेट घेण्यावर आणि विजय मिळवण्यावर असते, सोशल मीडियावर नाही. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो.’

सरकार आणि मंडळाच्या निर्णयांचे पालन

आशिया कप २०२५ मध्ये भारताला १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी एका वृत्तवाहिनीवर शमीला विचारण्यात आले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे का? तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले आणि सांगितले की, ‘मी वादांपासून दूर राहतो. सामन्यांबद्दलचे निर्णय सरकार आणि बीसीसीआय घेतात. आम्ही त्याचे पालन करतो.’
Comments
Add Comment

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर