गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार


गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवादी आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक .३०३ रायफल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमक अद्याप सुरू आहे.





गडचिरोलीनारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक दहा आणि इतर माओवादी नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा पथकास दिली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी - ६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ जलद कृती दलाची (CRPF QAT) दोन पथके जंगल परिसरात रवाना झाली. मुसळधार पावसामुळे सुरक्षा पथकाला नक्षलवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले. पण सर्व अडचणींवर मात करत सुरक्षा पथकाने जंगलात शोध मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाचे जवान बघून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. जंगलात लपलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: