जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने मराठा समूह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हाती आलेल्या महितीनुसार जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून निघाले असून, थोड्याच वेळात ते शहागड येथे दाखल होणार आहेत‌.आशाप्रकारे ते येत्या २८ ऑगस्ट रोजी ते मुंबईत पोहोचणार आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे आंदोलन करणार आहेत.


सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, ठरल्याप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी मराठा समूह मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वाहतूक व्यवस्था आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे आहे. सध्या जरांगे पाटलांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ते ज्या ज्या मार्गाहून जाणार आहेत, तिथे त्यांचे स्वागत होताना दिसून येत आहे.


नुकतीच हातात आलेल्या माहितीनुसार, जरांगे शहागड येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेन उभा करण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते शहागड मधून पैठण आणि पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.



कसा असेल प्रवास?


मनोज जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा जुन्नर येथे होणार आहे. शहागडवरून हा मोर्चा जुन्नरकडे जाणार आहे. पुढे मुंबईत हा मोर्चा दाखल होईल.


Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसराला रविवारी रेड अलर्ट

मुंबई : रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई

मुंबईत दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) मुंबई युनिटने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद

मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत

राज्याला पावसाचा दणका; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला येणार गती

मुंबई : लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाच्या अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात