जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने मराठा समूह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हाती आलेल्या महितीनुसार जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून निघाले असून, थोड्याच वेळात ते शहागड येथे दाखल होणार आहेत‌.आशाप्रकारे ते येत्या २८ ऑगस्ट रोजी ते मुंबईत पोहोचणार आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे आंदोलन करणार आहेत.


सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, ठरल्याप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी मराठा समूह मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वाहतूक व्यवस्था आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे आहे. सध्या जरांगे पाटलांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ते ज्या ज्या मार्गाहून जाणार आहेत, तिथे त्यांचे स्वागत होताना दिसून येत आहे.


नुकतीच हातात आलेल्या माहितीनुसार, जरांगे शहागड येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेन उभा करण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते शहागड मधून पैठण आणि पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.



कसा असेल प्रवास?


मनोज जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा जुन्नर येथे होणार आहे. शहागडवरून हा मोर्चा जुन्नरकडे जाणार आहे. पुढे मुंबईत हा मोर्चा दाखल होईल.


Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी