पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा मोठा फटका गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला बसला असून, शाळेचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे सुमारे ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी तिथे अडकले आहेत.


ही शाळा गुरुदासपूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. तळमजल्यावरील वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याने भरल्या असून, रस्ते खराब झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्याचे अधिकारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बचावकार्य सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, पुराची शक्यता तीन दिवसांपासून माहीत असतानाही मुलांना सुरक्षित का हलवले नाही, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी दिली असताना, या निवासी शाळेतील मुलांना घरी का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


१९८८ च्या महापुरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सध्याची परिस्थिती त्यावेळेपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा केला जात आहे. शाळेजवळचा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे पाणी थेट वस्तीमध्ये शिरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात