पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा मोठा फटका गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला बसला असून, शाळेचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे सुमारे ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी तिथे अडकले आहेत.


ही शाळा गुरुदासपूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. तळमजल्यावरील वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याने भरल्या असून, रस्ते खराब झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्याचे अधिकारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बचावकार्य सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, पुराची शक्यता तीन दिवसांपासून माहीत असतानाही मुलांना सुरक्षित का हलवले नाही, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी दिली असताना, या निवासी शाळेतील मुलांना घरी का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


१९८८ च्या महापुरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सध्याची परिस्थिती त्यावेळेपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा केला जात आहे. शाळेजवळचा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे पाणी थेट वस्तीमध्ये शिरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव