"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया अमरावतीमधील भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून मुबंईच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच, जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची योजना आखली आहे, ज्याचा परिणाम गणेशोत्सवावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या काळांत मुंबईत लाखोंच्या संख्येने भाविक गणपती पाहायला येतात, अशावेळी जरांगे पाटलांचि फौज मुंबईत धडकणार असल्याने प्रशासनाचे देखील काम वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर,  जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवानंतर आंदोलनाला सुरुवात करावी, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

नवनीत राणा यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटील भूमिकेवर प्रतिक्रिया देताना आपले मत मांडताना म्हंटले की, "न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. गणेशोत्सव हिंदूंचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात खूप उत्साहाचं वातावरण असून, तो महाराष्ट्रात अतिशय भक्तीभावानं सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असतो. त्यामुळे हे ११ दिवस सोडून, परत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर येऊ शकता."
Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री