बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाचे आगमन ! या ठिकाणी यलो अलर्ट जारी

  57

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत घेतलेल्या आढाव्यानंतर ही सूचना दिली आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) व SDRF (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांना अलर्टवर ठेवले आहे. सध्या राज्यात १८ NDRF पथके आणि ६ SDRF पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. मुंबईत २ NDRF पथके नेहमीसाठी तैनात असून, आणखी ३ पथके मान्सूनसाठी सज्ज आहेत. याशिवाय पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, कराड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि पुणे येथेही पथके तैनात आहेत. SDRF चे पथक नागपूर, गडचिरोली, धुळे आणि नांदेड येथे सक्रिय आहेत.


गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात ३४. ७ मिमी झाली आहे. त्यानंतर पालघरमध्ये ३०. ३० मिमी, ठाण्यात ३० मिमी, नंदुरबारमध्ये २७. १ मिमी आणि रत्नागिरीत १७. ५ मिमी पाऊस झाला आहे.


मुंबई उपनगरात या पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना घडली असून, एक व्यक्ती जखमी झाला आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था (NRSC) यांच्याकडून सतत माहिती घेतली जात असून, ती संबंधित जिल्ह्यांना पाठवली जात आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर