पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होईल. पुणे शहरात विशेषतः मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भक्तगण या मिरवणुकांसाठी रस्त्यावर गर्दी करणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी संबंधित मंडळांनी वेळापत्रक निश्चित केले असून खाली त्याचा तपशील दिला आहे:


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती : या गणपतीची मिरवणूक सकाळी ८ वाजता निघेल . प्रभात बँड आणि ढोलताशा पथकासह मिरवणूक निघेल. प्रतिष्ठापना आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होईल.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी मंडळ : सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरून मिरवणूक निघेल . या गणपतीचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे . प्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरच्या
महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभारली आहे.


मानाचा तिसरा गणपती – गुरुजी तालीम मंडळ : सकाळी ११ वाजता या गणपतीची मिरवणूक निघेल . दुपारी २. ३४ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल . हे मंडळ यंदा १३९ व्या वर्षात पदार्पण करत असून, आकर्षक फुलांच्या रथातून गणेश मूर्ती आणली जाईल.


मानाचा चौथा गणपती – तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी १२. १५ वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल . यंदा मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठापना निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते होईल. यंदा वृंदावनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरीवाडा गणपती मंडळ : सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होईल. सकाळी १० ते ११ यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ११ वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे .


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल पुणे प्रशासनाकडून उचलण्यात आले आहे . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणूक मार्गांवरील सर्व दारू विक्री केंद्रांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणेकरांनी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.