वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू


जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पूर आला आहे. जम्मूतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कटरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जमीन खचल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अर्द्धकुमारीजवळ दरड कोसळली आणि जीवितहानी झाली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी दुपारी भूस्खलन झाले. या अपघातात अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर प्रसिद्ध मंदिराची तीर्थयात्रा थांबवण्यात आली आहे. अर्द्धकुमारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी 3 वाजता भूस्खलन झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावर असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या बारा किलोमीटरच्या वळणावळणाच्या मार्गावर साधारणपणे अर्ध्या वाटेवर ही घटना घडली.


हिमकोटी मार्गावरील यात्रा सकाळपासूनच स्थगित करण्यात आली होती. पण दुपारी दीड वाजेपर्यंत जुन्या मार्गावरील यात्रा सुरू होती. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावरील यात्राही स्थगित केली आहे. डोडा येथे ढगफुटीमुळे तवी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. सततच्या जोरदार पावसामुळे जलाशयांमध्ये पाणी साचल्याने चौथ्या तवी पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे. डोडा येथे पाऊस आणि पुरामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे.


अनेक भागांतील घरांचे आणि इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. बचाव व मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना, विशेषतः सखल आणि डोंगराळ भागांत राहणाऱ्या लोकांना, थांबून-थांबून होत असलेल्या पावसामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना २७ ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार