सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

  53


पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम २० ऑगस्ट रोजी सिंहगडावरुन बेपत्ता झाला होता. अखेर २४ ऑगस्ट रोजी तो दरीत जिवंत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी गौतमला दरीतून वर आणले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते.


गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे पाच जण सिंहगड फिरण्यासाठी गेले होते. ते बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळी लघुशंका करून येतो असे सांगून गौतम तानाजी कडाच्या दिशेने गेला. नंतर गौतम बेपत्ता झाला, त्याच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मित्रांनी शोध घेतला त्यावेळी कड्यावर एका ठिकाणी गौतमची चप्पल दिसली आणि पण गौतम तिथे नव्हता. अखेर पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० क्रमांकावर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने गौतमचा शोध सुरू केला. पण गौतम सापडला नव्हता. अखेर २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनीच गौतमला गडावरील वाहनतळावर नेले. तिथून गौतमला रुग्णालयात नेण्यात आले.


Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू