सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला


पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम २० ऑगस्ट रोजी सिंहगडावरुन बेपत्ता झाला होता. अखेर २४ ऑगस्ट रोजी तो दरीत जिवंत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी गौतमला दरीतून वर आणले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते.


गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे पाच जण सिंहगड फिरण्यासाठी गेले होते. ते बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळी लघुशंका करून येतो असे सांगून गौतम तानाजी कडाच्या दिशेने गेला. नंतर गौतम बेपत्ता झाला, त्याच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मित्रांनी शोध घेतला त्यावेळी कड्यावर एका ठिकाणी गौतमची चप्पल दिसली आणि पण गौतम तिथे नव्हता. अखेर पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० क्रमांकावर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने गौतमचा शोध सुरू केला. पण गौतम सापडला नव्हता. अखेर २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनीच गौतमला गडावरील वाहनतळावर नेले. तिथून गौतमला रुग्णालयात नेण्यात आले.


Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव