सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला


पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम २० ऑगस्ट रोजी सिंहगडावरुन बेपत्ता झाला होता. अखेर २४ ऑगस्ट रोजी तो दरीत जिवंत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी गौतमला दरीतून वर आणले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते.


गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे पाच जण सिंहगड फिरण्यासाठी गेले होते. ते बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळी लघुशंका करून येतो असे सांगून गौतम तानाजी कडाच्या दिशेने गेला. नंतर गौतम बेपत्ता झाला, त्याच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मित्रांनी शोध घेतला त्यावेळी कड्यावर एका ठिकाणी गौतमची चप्पल दिसली आणि पण गौतम तिथे नव्हता. अखेर पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० क्रमांकावर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने गौतमचा शोध सुरू केला. पण गौतम सापडला नव्हता. अखेर २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनीच गौतमला गडावरील वाहनतळावर नेले. तिथून गौतमला रुग्णालयात नेण्यात आले.


Comments
Add Comment

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग