सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला


पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम २० ऑगस्ट रोजी सिंहगडावरुन बेपत्ता झाला होता. अखेर २४ ऑगस्ट रोजी तो दरीत जिवंत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी गौतमला दरीतून वर आणले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते.


गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे पाच जण सिंहगड फिरण्यासाठी गेले होते. ते बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळी लघुशंका करून येतो असे सांगून गौतम तानाजी कडाच्या दिशेने गेला. नंतर गौतम बेपत्ता झाला, त्याच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मित्रांनी शोध घेतला त्यावेळी कड्यावर एका ठिकाणी गौतमची चप्पल दिसली आणि पण गौतम तिथे नव्हता. अखेर पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० क्रमांकावर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने गौतमचा शोध सुरू केला. पण गौतम सापडला नव्हता. अखेर २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनीच गौतमला गडावरील वाहनतळावर नेले. तिथून गौतमला रुग्णालयात नेण्यात आले.


Comments
Add Comment

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला