मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

  31


मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक मासळी बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी हा नवा मासळी बाजार उभारण्याची योजना आहे. प्रस्तावीत मासळी बाजार हा देशातील सर्वाधिक आधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाच मजली मासळी बाजार असेल.


जे. बी. नगर येथील जवळपास सहा हजार चौरस मीटर भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. या जागेवर सध्या एक स्थानिक मासळी बाजार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटरवर ही जागा असून मेट्रो स्थानकही येथून जवळ आहे. या बाजाराची इमारत पर्यावरणपूरक असेल; ज्यात कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होणार आहे. तसेच, पाण्याचा पुनर्वापर आणि सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार आहे.


प्रस्तावीत मासळी बाजारात पारंपरिक कोळी संस्कृतीची अनुभूती देणारे एक रेस्टॉरन्ट आणि एक संग्रहालय यांचेही नियोजन आहे. या मासळी बाजारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'एआय'ची मदत घेतली जाईल. भूमिगत कचराकुंड्या आणि स्मार्ट सेन्सर आदींचा वापर करण्यात येणार आहे. विजेबाबत इमारत स्वयंपूर्ण असावी यासाठी सौरऊर्जा पॅनलचा अंतर्भावही इमारतीत करण्यात येणार आहे. अंधेरीच्या पाच मजली मासळी बाजारात सुक्या माशांचा बाजार, संग्रहालय, कोल्ड स्टोरेज, कोळी भवन, समाज सभागृह रेस्टॉरन्ट, प्रशिक्षण केंद्र आणि पार्किंग स्पेस (वाहनतळ) या प्रमुख सोयीसुविधा असतील.


Comments
Add Comment

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून