Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग


मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसला कशेडी घाटाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे.


रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही हे सुदैव. 


मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होती. ही बस मुंबई येथून मालवणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ असताना या बसचा टायर खूप गरम झाला आणि त्याने अचानक पेट घेतला. दरम्यान ही आग वेगाने पसरत असताना बस ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पाहता पाहता ही आग इतकी प्रचंड पसरली की संपूर्ण बसची जळून खाक झाली.



या दुर्घटनेनंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमनी मोठ्या सामानासह कोकणात निघाले होते. मात्र बसच्या डिकीत प्रवाशांचे सामान होते आणि हे सामान काढण्याआधी बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मात्र यात नुकसान झाले.




Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार