Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग


मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसला कशेडी घाटाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे.


रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही हे सुदैव. 


मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होती. ही बस मुंबई येथून मालवणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ असताना या बसचा टायर खूप गरम झाला आणि त्याने अचानक पेट घेतला. दरम्यान ही आग वेगाने पसरत असताना बस ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पाहता पाहता ही आग इतकी प्रचंड पसरली की संपूर्ण बसची जळून खाक झाली.



या दुर्घटनेनंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमनी मोठ्या सामानासह कोकणात निघाले होते. मात्र बसच्या डिकीत प्रवाशांचे सामान होते आणि हे सामान काढण्याआधी बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मात्र यात नुकसान झाले.




Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ