Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग


मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसला कशेडी घाटाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे.


रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही हे सुदैव. 


मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होती. ही बस मुंबई येथून मालवणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ असताना या बसचा टायर खूप गरम झाला आणि त्याने अचानक पेट घेतला. दरम्यान ही आग वेगाने पसरत असताना बस ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पाहता पाहता ही आग इतकी प्रचंड पसरली की संपूर्ण बसची जळून खाक झाली.



या दुर्घटनेनंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमनी मोठ्या सामानासह कोकणात निघाले होते. मात्र बसच्या डिकीत प्रवाशांचे सामान होते आणि हे सामान काढण्याआधी बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मात्र यात नुकसान झाले.




Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५