Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग


मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसला कशेडी घाटाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे.


रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही हे सुदैव. 


मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होती. ही बस मुंबई येथून मालवणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ असताना या बसचा टायर खूप गरम झाला आणि त्याने अचानक पेट घेतला. दरम्यान ही आग वेगाने पसरत असताना बस ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पाहता पाहता ही आग इतकी प्रचंड पसरली की संपूर्ण बसची जळून खाक झाली.



या दुर्घटनेनंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमनी मोठ्या सामानासह कोकणात निघाले होते. मात्र बसच्या डिकीत प्रवाशांचे सामान होते आणि हे सामान काढण्याआधी बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मात्र यात नुकसान झाले.




Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर