भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी


नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या घेतल्या. ओडिशाच्या किनाऱ्यावर या चाचण्या घेण्यात आल्या. स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचण्यासाठी डीआरडीओच्या संपूर्ण टीमचे तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनांचे अभिनंदन केले.





भारताच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनं आणि भारतीय सैन्य यांचे अभिनंदन करतो, अशी एक्स पोस्ट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सक्षम होण्यास आणखी मदत होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. शत्रूकडून असलेल्या सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यापासून देशाचे रक्षण करणे तसेच शत्रूचा यशस्वीरित्या मुकाबला करणे या हेतूंसाठी स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणा विकसित केल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.


देशाच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेत स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र आहेत. या यंत्रणेच्या मदतीने शत्रूचे विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन आदी स्वरुपाचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे तसेच शत्रूवर आकाशातून प्रतिहल्ला करणे शक्य होणार आहे.





Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या