अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?


मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पार्किंगच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता अमित राज ठाकरे यांनी शेलारांची भेट घेतली. यामुळे मनसे आणि भाजप यांच्यात नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. या व्यतिरिक्त आणखीही काही मागण्या अमित ठाकरेंनी निवेदनाद्वारे मंत्री आशिष शेलार यांना सादर केल्या.


गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. विद्यार्थ्यांनी कुटुंबासोबत तसेच समाजासोबत हा सण साजरा करायला हवा. यानिमित्ताने प्रत्येकाची समाजाशी असलेली नाळ आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची ठाम अपेक्षा आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात कुठेही गणेशोत्सव काळात परीक्षा होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आवश्यक तेवढे तीव्र आंदोलन करू यात काही शंका नाही, असा इशाराही अमित ठाकरेंनी पत्राद्वारे दिला आहे.


अमित ठाकरेंच्या प्रमुख मागण्या




  1. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांनी गणेशोत्सव काळात परीक्षांचे आयोजन करणे टाळावे. आधीच जाहीर केलेल्या परीक्षा असल्यास त्या पुढे ढकलाव्या.

  2. गणेशोत्सव काळात परीक्षा घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर सरकारने कारवाई करावी

  3. विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी शासनाने तसेच शिक्षण संस्थांनी प्रोत्साहन द्यावे


Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता