अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?


मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पार्किंगच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता अमित राज ठाकरे यांनी शेलारांची भेट घेतली. यामुळे मनसे आणि भाजप यांच्यात नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. या व्यतिरिक्त आणखीही काही मागण्या अमित ठाकरेंनी निवेदनाद्वारे मंत्री आशिष शेलार यांना सादर केल्या.


गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. विद्यार्थ्यांनी कुटुंबासोबत तसेच समाजासोबत हा सण साजरा करायला हवा. यानिमित्ताने प्रत्येकाची समाजाशी असलेली नाळ आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची ठाम अपेक्षा आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात कुठेही गणेशोत्सव काळात परीक्षा होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आवश्यक तेवढे तीव्र आंदोलन करू यात काही शंका नाही, असा इशाराही अमित ठाकरेंनी पत्राद्वारे दिला आहे.


अमित ठाकरेंच्या प्रमुख मागण्या




  1. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांनी गणेशोत्सव काळात परीक्षांचे आयोजन करणे टाळावे. आधीच जाहीर केलेल्या परीक्षा असल्यास त्या पुढे ढकलाव्या.

  2. गणेशोत्सव काळात परीक्षा घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर सरकारने कारवाई करावी

  3. विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी शासनाने तसेच शिक्षण संस्थांनी प्रोत्साहन द्यावे


Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल