वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना व धोकादायक विजेचा खांब कोसळला. सुदैवाने, या अपघातात विद्यार्थी थोडक्यात बचावला.


ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विजेचा खांब खूप दिवसांपासून खराब अवस्थेत होता. त्यांनी महावितरण आणि स्थानिक पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.


परिणामी, निष्काळजी प्रशासनामुळे निष्पाप विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला. या घटनेनंतर स्थानिकांनी महावितरण आणि पालिका प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.


संबंधित विभागांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी जनतेची मागणी आहे.

Comments
Add Comment

Airport Job Fraud : विमानतळावरील नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; परीक्षा केंद्रावर पोहोचताच झाला प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित

Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना; 1850 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)

Pune Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ , संमतीपत्र न दिल्यास सक्तीने संपादन

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या

Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत यंदाच्या वर्षातला तिसरा विमान अपघात झाला आहे. ताजी घटना आज म्हणजेच रविवार ९

Pune Pub Raid : पहाटे ३ वाजेपर्यंत पार्टी रंगणाऱ्या पबवर पोलिसांची धाड! ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पब आणि क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विमानतळ

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या