ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ९६ मंडळांनी शनिवारी लेझिम आणि ढोल – ताशांच्या गजरात गणेशमूर्ती मंडपात नेल्या. या मिरवणूका पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. परिणामी, अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.


गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवापूर्वीच गणेश आगमन मिरवणुका काढण्याची पय्था रूढ झाली आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या ९६ मंडळांची गणेशमूर्ती शनिवारी वाजतगाजत मंडपस्थळी मार्गस्थ झाली. यंदा शासनाने मोठ्या आवाजातील वाद्यांवर बंदी घातल्याने पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींचे आगमन झाले. काही मंडळांनी ध्वनिक्षेपकावर गाणी लावून जल्लोष साजरा केला. अनेक मंडळांनी मिरवणुकीत केवळ ढोल – ताशा, लेझिमचा वापर करून पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या.


चांदिवलीचा राजा, मरोळचा मोरया, गोरेगावचा महाराजा, विघ्नहर्ता एल्फिन्स्टनचा, विक्रोळीचा गणराज, अँटॉप हिलचा राजा, मालाडचा महागणपती, भटवाडीचा राजा आदी विविध गणेश मंडळांच्या मूर्तींचे शनिवारी आगमन झाले. काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे फलक आणि झांजपथकाचाही मिरवणुकीत समावेश केला. या मिरवणुकींमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. दादर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, अंधेरी आदी भागांमध्ये वाहनचालकांना विलंबाचा सामना करावा लागला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Comments
Add Comment

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन