Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये प्रवाशांना विशेष सुविधा दिल्या जात असून, त्यांना त्यांच्या  गंतव्यस्थानावर उच्च वेगाने पोहोचवण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे भारतभर वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करत आहे. भारतीय रेल्वे सतत अधिकाधिक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करत असताना, दुसरीकडे, महत्त्वाच्या विभागांमध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक देखील बदलले जात आहे. अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या तिसऱ्या वंदे भारत ट्रेनची देखील वेळ बदलली गेली आहे.


देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. ही वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर राजधानी दरम्यान धावते. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन पश्चिम रेल्वे (WR) झोनद्वारे चालवली जात आहे.



वंदे भारत ट्रेनचा एक थांबा वाढवला


या ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल- मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६:३० वाजता ५२१ किमी अंतर कापते. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर कॅपिटल दरम्यानच्या प्रवासादरम्यान, ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ वंदे भारत एक्सप्रेस आता सात ऐवजी आठ रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्यानुसार, भारतीय रेल्वेच्या झोनल रेल्वेने नवसारी स्थानकावर नवीन थांबा दिला आहे.



वंदे भारत सेमी हाय स्पीड ट्रेनची  स्थानकं


ट्रेन बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन आणि अहमदाबाद जंक्शन येथे थांबेल.



वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक


नवीन वेळापत्रकानुसार, वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०९०१) मुंबई सेंट्रलहून सकाळी ६:०० वाजता निघते आणि दुपारी १२:२५ वाजता गांधीनगर राजधानीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक २०९०२ गांधीनगरहून दुपारी २:०५ वाजता निघते आणि रात्री ८:३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.


वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल-गांधीनगर राजधानी-मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेनमध्ये २० कोच आहेत. यात दोन प्रकारची बसण्याची व्यवस्था आहे. यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे.

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.