Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये प्रवाशांना विशेष सुविधा दिल्या जात असून, त्यांना त्यांच्या  गंतव्यस्थानावर उच्च वेगाने पोहोचवण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे भारतभर वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करत आहे. भारतीय रेल्वे सतत अधिकाधिक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करत असताना, दुसरीकडे, महत्त्वाच्या विभागांमध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक देखील बदलले जात आहे. अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या तिसऱ्या वंदे भारत ट्रेनची देखील वेळ बदलली गेली आहे.


देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. ही वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर राजधानी दरम्यान धावते. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन पश्चिम रेल्वे (WR) झोनद्वारे चालवली जात आहे.



वंदे भारत ट्रेनचा एक थांबा वाढवला


या ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल- मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६:३० वाजता ५२१ किमी अंतर कापते. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर कॅपिटल दरम्यानच्या प्रवासादरम्यान, ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ वंदे भारत एक्सप्रेस आता सात ऐवजी आठ रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्यानुसार, भारतीय रेल्वेच्या झोनल रेल्वेने नवसारी स्थानकावर नवीन थांबा दिला आहे.



वंदे भारत सेमी हाय स्पीड ट्रेनची  स्थानकं


ट्रेन बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन आणि अहमदाबाद जंक्शन येथे थांबेल.



वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक


नवीन वेळापत्रकानुसार, वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०९०१) मुंबई सेंट्रलहून सकाळी ६:०० वाजता निघते आणि दुपारी १२:२५ वाजता गांधीनगर राजधानीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक २०९०२ गांधीनगरहून दुपारी २:०५ वाजता निघते आणि रात्री ८:३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.


वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल-गांधीनगर राजधानी-मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेनमध्ये २० कोच आहेत. यात दोन प्रकारची बसण्याची व्यवस्था आहे. यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या

रायसिन विष बनवणाऱ्या सैयदचा पाकिस्तानशी संबंध उघड

ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्क अहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे

Bihar Election Result 2025 : बिहारचे 'किंगमेकर' नितीश कुमार! महिला मतदारांच्या पाठिंब्याने '१० व्यांदा' मुख्यमंत्री होणार ?

पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे राजकीय प्रयोग जन सुराज पार्टीसाठी (Jan Suraj Party) पहिल्या

ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द! पक्षांतरविरोधी कायद्याचा पहिल्यांदाच देशात वापर

कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हॉस्पिटलमध्ये ; प्रकृतीत सुधार

सिक्कीम : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांना गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल