सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातपिके आडवी

  27

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हळवी पिके हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी विभागाने अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली नाही, मात्र शेकडो एकरवरील हळवी भातपिकांचे नुकसान होऊ लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.९) दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोपून काढले आहे. सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय जिल्ह्यात उर्वरित भागाला देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. उभी पिके आडवी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड आहे.

त्यातील ५ ते ६ हजार हेक्टर भातपिकाची पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आली होती. हे पीक महिनाभरापूर्वीच परिपक्व झालेले आहे. सततच्या पावसामुळे हे पीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने सप्टेंबर अखेरीपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहे. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. असे असले तरी शेकडो एकर भातपिकांचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे.
Comments
Add Comment

गणेशोत्सवादरम्यान कोकणवासियांसाठी महामार्गावर विशेष वाहतूक नियोजन - पोलिस, एसटी व प्रशासन सज्ज

नवीमुंबई : राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सहा दिवसानंतर तेजीला ब्रेक, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान! सेन्सेक्स निफ्टीत घसरण

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सहा दिवसांची वाढ अखेर थांबल्यानंतर

सातारा : पावसाचा जोर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर, सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी अखेर

Beed Crime :उपमुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

बीड:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने