जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत क्लीनरची आवश्यकता नाही, अधिसूचना जारी

  36


मुंबई : जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत क्लीनरची आवश्यकता नाही. या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून २९ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना मागण्यात आल्या आहेत. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत क्लीनर देण्याची अट शिथील करण्याची आग्रही मागणी केली होती. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे क्लीनरची गरज पडत नाही. तरी ही अट कायम ठेवल्यामुळे खर्च वाढत होता. हा खर्च कमी करण्यासाठीच क्लीनरची अट शिथील करण्याची मागणी होत होती. अखेर महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. हरकती आणि सूचनांची दखल घेऊन राज्य शासन २९ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.


नागरिकांना हरकती - सूचना परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, पाचवा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. दोन, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 येथे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ड्रायव्हर असिस्ट सिस्टीमने सुसज्ज जड मालवाहतूक वाहनामध्ये क्लीनरची आवश्यकता नाही. कारण या वाहनांमध्ये 360 अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असते. या सर्व यंत्रणेने सुसज्ज ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम असल्यास संबंधित जड मालवाहक वाहनासाठी क्लीनरची आवश्यकता नाही.


Comments
Add Comment

मुंबईच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा!

मुंबई: 'एन्व्हायर्नमेंट स्टेटस रिपोर्ट' २०२४-२५ नुसार, बीएमसीच्या जल प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्यांमध्ये असे

'विक्रोळी उड्डाणपुला'ची दुरुस्ती होणार!

मुंबई: 'बृहन्मुंबई महानगरपालिके'च्या पूल विभागाच्या एका पथकाने नुकत्याच उद्घाटित झालेल्या विक्रोळी रेल्वे

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३०

Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या

मुंबईकरांना दिलासा : तीन दिवसांत रस्त्यांवरील खड्डे होणार गायब !

मुंबई : सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी