सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सायबर हल्ल्यांच्या यादीत भारताने ब्राझील आणि स्पेनला मागे टाकले असून, सायबर हल्लेखोरांचे भारत सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे.


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या उपकरणांवर होणाऱ्या मालवेअर हल्ल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. मे महिन्यात हे प्रमाण १२.४ टक्के होते, जे जूनमध्ये वाढून १३.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. हा आकडा जगभरातील देशांपेक्षा जास्त आहे.



याशिवाय, अधिकृत ईमेलवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीला २० टक्के असलेले हे हल्ले २०२५ च्या पहिल्या सहामाहीत २५.६ टक्क्यांवर पोहोचले आहेत. सायबर गुन्हेगार आता क्रेडिट कार्ड आणि पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत.


अहवालात असेही म्हटले आहे की, जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे तांत्रिक अडथळे कमी झाले आहेत. यामुळे फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे अधिक कठीण झाले आहे. कोविड-१९ नंतरच्या 'हायब्रिड वर्क मॉडेल'मुळे अनेक कंपन्यांच्या सिस्टीम असुरक्षित बनल्या आहेत, असे 'अ‍ॅक्रोनिस'चे भारत आणि दक्षिण आशियाचे महाव्यवस्थापक राजेश छाब्रा यांनी सांगितले.


भारतातील उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सेवा आणि दूरसंचार उद्योग हे सायबर हल्ल्यांच्या सर्वात मोठ्या धोक्यात आहेत. मालवेअर हल्ल्यांद्वारे हॅकर्स डिव्हाइसचा ताबा घेतात. भारताच्या वाढत्या डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.