‘वराह भगवान‘जयंती राज्यभरात साजरी व्हावी!

मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी


मुंबई: वराह देवाचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे, येत्या २५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. राज्यभर हा जयंती उत्सव अधिकृतरीत्या साजरा व्हावा, या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी चार गोष्टींचा विचार व्हावा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


राज्यात वराह जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जावी यासाठी मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.


‘हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे. २५ ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचं धार्मिक तसंच सांस्कृतिक महत्त्व अपार आहे.


वराह भगवानाच्या पूजनानं वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. हिंदू समाजात या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकतरीत्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसंच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य ती अधिसूचना देण्यात यावी’, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी पत्रामध्ये केली आहे.


मंत्री राणे यांच्या मागणीमुळे यंदा वराह भगवान जयंती उत्साहात साजरी हाेणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.




  • २५ ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा.

  • शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.

  • शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत.

  • मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्तीचे आयोजन करण्यात यावे.

Comments
Add Comment

ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)