Pune Velhe Taluka : ऐतिहासिक निर्णय! पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर केंद्राचा शिक्का, काय असणार नवं नाव?

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला (Velhe Taluka) आता नवं नाव मिळालं आहे. वेल्हे तालुका अधिकृतपणे ‘राजगड तालुका’ म्हणून ओळखला जाणार आहे. या नावबदलाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्याने ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांच्या इतिहासात महत्वाचं स्थान असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका वसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर नाव बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतींकडून सातत्याने होत होती. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. तालुक्यातील ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेनं याला मंजुरी दिली होती. महसूल विभागानेही ठरावावर शिक्कामोर्तब करत राजपत्र प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका इतिहासाशी जोडला जात असून, ‘राजगड तालुका’ या नव्या नावाने महाराष्ट्राच्या प्रशासनिक नकाशावर नवी नोंद होणार आहे.




वेल्हे तालुक्याला मिळालं ऐतिहासिक ‘राजगड’ नाव


पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याला अखेर इतिहासाशी जोडलेलं नवं नाव मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षं स्वराज्याची राजधानी म्हणून जपलेला राजगड किल्ला, तोरणा यांसारखे दुर्ग या तालुक्यात असल्याने, या भागाला ‘राजगड तालुका’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिक ही मागणी सातत्याने करत होते. अखेर या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्याने स्थानिकांच्या भावनांना दिलासा मिळाला आहे. राजगड किल्ला स्वराज्याच्या इतिहासातील पहिली राजधानी असल्याने या तालुक्याला मिळालेलं नवं नाव अधिक गौरवशाली मानलं जात आहे.



७० ग्रामपंचायतींचा ठराव सफल


वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्याच्या मागणीला अखेर केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. या निर्णयासाठी ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी सकारात्मक ठराव मंजूर केले होते. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेतही या बदलाला हिरवा कंदील देण्यात आला होता. पुढे पुणे विभागीय आयुक्तांनी ५ मे २०२२ रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. आता केंद्र सरकारने देखील ‘राजगड’ नावाला औपचारिक मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. यामुळे इतिहासाशी निगडित मागणी पूर्ण झाली आहे.

Comments
Add Comment

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने

Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला

नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे.

Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Education : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जून पासून नवीन अभ्यासक्रम

नागपूर : नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा