पुण्यात सिंहगडावर पर्यटनाला आलेला युवक अद्याप बेपत्ता! नेमकं काय झालं?

पुणे : सध्या पावसाळी पर्यटनाला चेव फुटला असून, अनेक पर्यटनप्रेमी गड किल्ल्यांवर तसेच निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत. मात्र, या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशीच एक घटना पुण्यातील सिंहगड येथून समोर येत आहे.


पावसाळी पर्यटनासाठी सिंहगड किल्ला प्रसिद्ध असून या परिसरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.  त्यानुसार या वर्षी देखील सिंहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यादरम्यान, आपल्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटायला आलेला, एक युवक गडावरील तानाजी कड्यावरून पाय घसरून खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौतम गायकवाड (वय २४) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याच्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. गौतम हा हैदराबादवरुन मित्रांसमवेत पर्यटनास आला होता.


घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी, व स्थानिक गिर्यारोहक कार्यकर्ते या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वाऱ्यात बेपत्ता गौतमचा शोध घेतला. मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबवले. त्यानंतर, आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत गौतमचा अद्याप शोध लागलेला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने एक युवक बेपत्ता झाला असून घटनास्थळी प्रशासन व पोलीस (Police) कर्मचारी पोहोचले आहेत.  हैदराबाद येथून गौतमसह ५ जणांचा ग्रुप पुणे येथे फिरण्यासाठी आला होता. काल बुधवारी दुपारी ४.३० वाजता ते सिंहगडावर आले, या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ येऊन ते पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यावेळी, गौतमने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र, बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही. त्यामुळे मित्रांनी गौतमचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नाही. सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त आहे. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असावा असा अंदाज त्याच्या मित्रांकडून लावला गेल्याने गौतमचा शोध घेतला जात आहे.


 
Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस