मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा


मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक अशी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कपातीविना किमान ३५८ दिवसांपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे.


भातसाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात ६,६८,२०१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २,०७,७६० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मध्य वैतरणाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,९०,९९३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मोडकसागरची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तानसाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,४५,०८० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तुळशीची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात ८०४६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. विहारची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २७,६९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे.


मुंबईकरांना महापालिकेकडून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नियोजनाचा विचार करता सध्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत वर्षभरासाठी चिंतामुक्त झाले आहेत.


Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)