मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा


मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक अशी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कपातीविना किमान ३५८ दिवसांपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे.


भातसाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात ६,६८,२०१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २,०७,७६० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मध्य वैतरणाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,९०,९९३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मोडकसागरची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तानसाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,४५,०८० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तुळशीची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात ८०४६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. विहारची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २७,६९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे.


मुंबईकरांना महापालिकेकडून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नियोजनाचा विचार करता सध्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत वर्षभरासाठी चिंतामुक्त झाले आहेत.


Comments
Add Comment

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग