मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा


मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक अशी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कपातीविना किमान ३५८ दिवसांपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे.


भातसाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात ६,६८,२०१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २,०७,७६० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मध्य वैतरणाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,९०,९९३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मोडकसागरची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तानसाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,४५,०८० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तुळशीची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात ८०४६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. विहारची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २७,६९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे.


मुंबईकरांना महापालिकेकडून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नियोजनाचा विचार करता सध्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत वर्षभरासाठी चिंतामुक्त झाले आहेत.


Comments
Add Comment

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी

BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा तीढा सुटणार

 उच्चस्तरीय समिती गठीत; बाह्य सीमा निश्चित करून सरकारला शिफारशी करणार मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या