स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले !

कॅनालायीस अहवालातील माहिती समोर


प्रतिनिधी: अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. असा अहवाल कॅनालायीस (Canalys) रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये ही संबंधित नवी माहिती दिली आहे. पोस्टनुसार, मेक इन इंडिया, पीए लआय (Production Linked Incentive PLI) सारख्या योजनांच्या पाठबळामुळे ही वाढ झाली आहे. एप्रिल ते जून महिन्यात चीनलाही स्मार्टफोन निर्यातीत मागे टाकण्यात आल्याचा दावा अहवालात केला गेला आहे.अहवालातील माहितीवर, मेड इन इंडियात उत्पादन वाढीचा फायदा निर्यातीत झाला. ज्यामुळे प्रत्यक्षात एप्रिल ते जून २०२५ मध्ये युएसमध्ये आयातीतील भारतीय शिपमेंटमध्ये ४४% वाढ झाली आहे. याचवेळी चीनच्या अमेरिकेतील स्मार्टफोन निर्यातीत ६१% टक्के घसरण झाली आहे ‌जी पूर्वी २५% मागील वर्षाच्या तिमाहीत होती. भारतीय स्मार्टफोन निर्यातीत मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत मात्र १३% वाढ झाली आहे.


भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील भरीव कामगिरीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन निर्यातीचा व्यापार भारतात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत स्मार्टफोन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारच्या पीएलआय, सब्सिडी अशा योजनांमुळे निर्यातीत वाढ होत असल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. मागील महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने या वाढीचा विस्तृत प्रगतीचा आलेख आपल्या अभ्यास अहवालात छापला होता. त्यामुळे कॅनालायीस रिसर्च कंपनीच्या रिसर्चमुळे ही निर्यातीतील वाढ भविष्यातही होऊ शकते हे अधोरेखित झाले‌. आर्थिक वर्ष २०१४- २०१५ व आर्थिक वर्ष २०२४-२५ या दरम्यान भारतीय औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल उत्पादनात विशाल परिवर्तन (Transformation) झाले होते.


केवळ मोबाईलचा विचार केल्यास, स्मार्टफोन उत्पादन १८००० कोटींवरून ही निर्यात ५.४५ लाख कोटींवर पोहोचले होते. स्मार्टफोन निर्यातीतही १५०० कोटींवरून वाढ होत २ लाख कोटी मुल्यांकनावर वाढ झाली आहे. एकूणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन श्रेणीत १.९ लाख कोटीवरून ५.४५ लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोबाईल युनिट उत्पादनात तब्बल १५०% वाढ गेल्या १० वर्षात झाली. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सरकारी आकडेवारीनुसार भारतात ७५% स्मार्टफोन आयात केले जात होते आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ कालावधीत केवळ मोबाईल आयात ०.०२% वर कायम आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार