स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले !

कॅनालायीस अहवालातील माहिती समोर


प्रतिनिधी: अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. असा अहवाल कॅनालायीस (Canalys) रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये ही संबंधित नवी माहिती दिली आहे. पोस्टनुसार, मेक इन इंडिया, पीए लआय (Production Linked Incentive PLI) सारख्या योजनांच्या पाठबळामुळे ही वाढ झाली आहे. एप्रिल ते जून महिन्यात चीनलाही स्मार्टफोन निर्यातीत मागे टाकण्यात आल्याचा दावा अहवालात केला गेला आहे.अहवालातील माहितीवर, मेड इन इंडियात उत्पादन वाढीचा फायदा निर्यातीत झाला. ज्यामुळे प्रत्यक्षात एप्रिल ते जून २०२५ मध्ये युएसमध्ये आयातीतील भारतीय शिपमेंटमध्ये ४४% वाढ झाली आहे. याचवेळी चीनच्या अमेरिकेतील स्मार्टफोन निर्यातीत ६१% टक्के घसरण झाली आहे ‌जी पूर्वी २५% मागील वर्षाच्या तिमाहीत होती. भारतीय स्मार्टफोन निर्यातीत मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत मात्र १३% वाढ झाली आहे.


भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील भरीव कामगिरीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन निर्यातीचा व्यापार भारतात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत स्मार्टफोन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारच्या पीएलआय, सब्सिडी अशा योजनांमुळे निर्यातीत वाढ होत असल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. मागील महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने या वाढीचा विस्तृत प्रगतीचा आलेख आपल्या अभ्यास अहवालात छापला होता. त्यामुळे कॅनालायीस रिसर्च कंपनीच्या रिसर्चमुळे ही निर्यातीतील वाढ भविष्यातही होऊ शकते हे अधोरेखित झाले‌. आर्थिक वर्ष २०१४- २०१५ व आर्थिक वर्ष २०२४-२५ या दरम्यान भारतीय औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल उत्पादनात विशाल परिवर्तन (Transformation) झाले होते.


केवळ मोबाईलचा विचार केल्यास, स्मार्टफोन उत्पादन १८००० कोटींवरून ही निर्यात ५.४५ लाख कोटींवर पोहोचले होते. स्मार्टफोन निर्यातीतही १५०० कोटींवरून वाढ होत २ लाख कोटी मुल्यांकनावर वाढ झाली आहे. एकूणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन श्रेणीत १.९ लाख कोटीवरून ५.४५ लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोबाईल युनिट उत्पादनात तब्बल १५०% वाढ गेल्या १० वर्षात झाली. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सरकारी आकडेवारीनुसार भारतात ७५% स्मार्टफोन आयात केले जात होते आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ कालावधीत केवळ मोबाईल आयात ०.०२% वर कायम आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या