तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं

  37


आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने अलीकडेच तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल १२१ किलो सोनं दान केलं आहे.


या सोन्याची किमत जवळपास १४० कोटी रुपये असल्याचे सांगितलं नातं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मावावत माहिती दिली. ते म्हणाले, "एका भक्ताने व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली होती. श्री वेंकटेश्वर स्वामीच्या कृपेने त्याला व्यवसायात षश मिळाले आणि त्याने कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून ६,००० ते ७,००० कोटी रुपये नफा मिळवला. त्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला."


पुढे बोलताना नायडू यांनी सांगिताले की, "मंदिरातील मूर्तीला दररोज १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. ही बाब त्याला समजल्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे माणने त्याने हे गुप्त दान असल्याचे सांगत स्वतःची ओळख उघड न करण्याची विनंती केली बाहे." तिरुपती कलानी मंदिरात अशाप्रकारे दान देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा या मंदिराला मोठं दान मिळालं आहे.


Comments
Add Comment

भारताच्या संरक्षण सामर्थ्यात मोठी वाढ; अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडिशा: भारताच्या संरक्षण सिद्धतेत आज एक मोठा टप्पा पार पडला. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली पैसे लावायला भाग पाडणाऱ्या आणि मोठे आमिष दाखवणाऱ्या गेम्सवर बंदी ?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल २०२५’ नावाचे विधेयक सादर केले

आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर केला चाकूने वार ! उपचारादरम्यान मृत्यू

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण

बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

भोपाळ: एकतर्फी प्रेमातून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या २६ वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून

लोकसभेत सादर झालेली ३ विधेयके काही मिनिटांत संयुक्त संसदीय समितीकडे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज

नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी