बोरघाट महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना


अलिबाग : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.


सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्या पत्राच्या अनुषंगाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र.४८) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील यापुर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे तसेच सद्यस्थितीत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना व जनतेच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावरुन जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.


महाड-भोर हा मार्ग एक जूनपासून ३१ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरता पूर्णतः बंद करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हा मार्ग ३१ सप्टेंबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहील, असे सांगण्यात आले आहे.


या कालावधीत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यास हा मार्ग बंद करावा भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट अथवा ऑरेंज दिला नसल्यास सदरचा घाट मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अतिवृष्टी व दरड कोसळल्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊन जीवित हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन या काळात हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


या दरम्यान नागरिकांनी व पर्यटकांनी पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर तामिळी घाट मुळशी पिरंगुट पुणे व कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई, सातारा, कराड या मार्गाचा अवलंब करावा, असे निर्देशित केले आहे.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता