बोरघाट महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना


अलिबाग : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ४८) बोरघाट या महामार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.


सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्या पत्राच्या अनुषंगाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र.४८) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील यापुर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे तसेच सद्यस्थितीत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना व जनतेच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावरुन जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.


महाड-भोर हा मार्ग एक जूनपासून ३१ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरता पूर्णतः बंद करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हा मार्ग ३१ सप्टेंबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहील, असे सांगण्यात आले आहे.


या कालावधीत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यास हा मार्ग बंद करावा भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट अथवा ऑरेंज दिला नसल्यास सदरचा घाट मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अतिवृष्टी व दरड कोसळल्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊन जीवित हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन या काळात हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


या दरम्यान नागरिकांनी व पर्यटकांनी पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर तामिळी घाट मुळशी पिरंगुट पुणे व कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई, सातारा, कराड या मार्गाचा अवलंब करावा, असे निर्देशित केले आहे.

Comments
Add Comment

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

आधार कार्डच्या शुल्कात वाढ; नाव, पत्ता बदलण्यासाठी ७५ रुपये मोजावे लागणार

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

‘स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही’

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ करा अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील हजारो