आगमन गणरायाचे, नियोजन एसटी महामंडळाचे

गणेशोत्सवासाठी सुटणार ५ हजारांहून अधिक एसटी बसेस


स्वप्नील पाटील


पेण : आषाढी एकादशी आणि राखी पौर्णिमेच्या यशस्वी कामगिरीनंतर आता गणेशोत्सवासाठी देखील राज्याचे एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी एसटी महामंडळाने ५ हजारांहून अधिक फेऱ्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये ५ हजार गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार असल्याने प्रवाशांमधून समाधानाचे सुरू ऐकायला मिळत आहेत.


यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून जरी असला तरी एसटी महामंडळाने २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत चार दिवसांत पाच हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्यांसाठी गाड्या तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये आधीच मुंबईमधून १५००, पालघर मधून ५०० तर ठाणे येथून २००० हून अधिक असे एकूण ४ हजार ग्रुपिंग बुकिंग एसटी महामंडळाकडे झाले आहे. तर ७०० हून अधिक गाड्या या गणेशोत्सव काळातील कोकणवासीयांसाठी इतर प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात आल्या.


तर रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी देखील रायगड एसटी महामंडळ पनवेलहून इतर गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती रायगड विभाग कार्यालयातून मिळाली आहे. एकंदरीत एसटी महामंडळ गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेऱ्यांचे नियोजन केले आहे.


कोकणवासीय गणेशभक्तांसाठी नियोजित एसटी बसेस


मुंबई ग्रुप बुकिंग १५३६         एसटी फेऱ्या - २६७           एकूण फेऱ्या - १८०३
पालघर ग्रुप बुकिंग ५३५       एसटी फेऱ्या - ७५              एकूण फेऱ्या - ६१०
ठाणे ग्रुप बुकिंग २१२२          एसटी फेऱ्या - ४३५            एकूण फेऱ्या - २५५७
एकूण ग्रुपिंग फेऱ्या ४१९२     एकूण इतर फेऱ्या - ७७७   एकूण फेऱ्या - ४९७०
Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज