आगमन गणरायाचे, नियोजन एसटी महामंडळाचे

गणेशोत्सवासाठी सुटणार ५ हजारांहून अधिक एसटी बसेस


स्वप्नील पाटील


पेण : आषाढी एकादशी आणि राखी पौर्णिमेच्या यशस्वी कामगिरीनंतर आता गणेशोत्सवासाठी देखील राज्याचे एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी एसटी महामंडळाने ५ हजारांहून अधिक फेऱ्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये ५ हजार गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार असल्याने प्रवाशांमधून समाधानाचे सुरू ऐकायला मिळत आहेत.


यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून जरी असला तरी एसटी महामंडळाने २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत चार दिवसांत पाच हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्यांसाठी गाड्या तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये आधीच मुंबईमधून १५००, पालघर मधून ५०० तर ठाणे येथून २००० हून अधिक असे एकूण ४ हजार ग्रुपिंग बुकिंग एसटी महामंडळाकडे झाले आहे. तर ७०० हून अधिक गाड्या या गणेशोत्सव काळातील कोकणवासीयांसाठी इतर प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात आल्या.


तर रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी देखील रायगड एसटी महामंडळ पनवेलहून इतर गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती रायगड विभाग कार्यालयातून मिळाली आहे. एकंदरीत एसटी महामंडळ गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेऱ्यांचे नियोजन केले आहे.


कोकणवासीय गणेशभक्तांसाठी नियोजित एसटी बसेस


मुंबई ग्रुप बुकिंग १५३६         एसटी फेऱ्या - २६७           एकूण फेऱ्या - १८०३
पालघर ग्रुप बुकिंग ५३५       एसटी फेऱ्या - ७५              एकूण फेऱ्या - ६१०
ठाणे ग्रुप बुकिंग २१२२          एसटी फेऱ्या - ४३५            एकूण फेऱ्या - २५५७
एकूण ग्रुपिंग फेऱ्या ४१९२     एकूण इतर फेऱ्या - ७७७   एकूण फेऱ्या - ४९७०
Comments
Add Comment

Raigad : दिघी खाडीत मच्छीमारांच्या बोटीला अपघात; फेरीबोटीने वाचवले तीन जीव

रायगड(Raigad) : जिल्ह्यातील दिघी खाडीत शनिवारी मासेमारीसाठी गेलेली एक छोटी बोट अचानक पाण्

Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

रायगड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर (Zenith Waterfall) शनिवारी मोठी दुर्घटना टळली.

New Ropeway Project : माथेरान ते रायगड किल्ल्यासह पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रायगड : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Ambenali Ghat : आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद

अलिबाग : आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून ही बाब लक्षात घेऊन

पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या

पनवेल : पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम