विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात सुरु असून आज बुधवारी देखील पाऊस सुरु आहे. सकाळी रेल्वे सेवा विरार ते अअंधेरी विस्कळीत झाली होती मात्र पुन्हा दुपारी १२ वाजल्यापासून सुरळीत सुरु झाली आहे.

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग १२ तासापासून पाण्याखाली आहे. तेथील विद्युत सप्लाय बंद असल्याने नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. काल वसई विरार क्षेत्रात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. संपूर्ण वसई विरार जलमय झालं होतं. अनेख सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मिटर बॉक्स पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. माञ अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने लाईट नाही आहे.

जवळपास १२ तासापासून काही ठिकाणी लाईट नाही आहे. विरार येथील गोकुळ टाउनशिप, छेडा नगर, स्टेशन परिसर वसईतील स्टेशन परिसर तसेच माणिकपूर मधील काही भाग, नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, पश्चिमेतील श्रीप्रस्थ रोड, या ठिकाणी काल दुपारी ३ वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली आहे. राञभर कोसळलेल्या पावसामुळे आताही सोसायटीमध्ये पाणी साचल्याने पाणी ओसरल्यावर तात्काळ वीज प्रवाह सुरु करण्यात येईल अशी माहीती महावितरणाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली आहे.

वसई-विरार : गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या