रायगडच्या बाळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी


पेण : रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला फटका बसला आहे. पेणमधील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे.


बाळगंगा नदीला पूर आल्याने तालुक्यातील खरोशी गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे खरोशी गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सतत जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. जिल्ह्यातील नद्यांच्या किनारी राहणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडो मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रशासन पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक ती मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.


Comments
Add Comment

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला

Sunetra Pawar : सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व

Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०