पुण्यात पावसाचा जोर वाढला, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, रेड अलर्ट जारी

गेल्या तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

प्रशासन व एनडीआरएफ पथके सज्ज असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे जुन्या पुण्यातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेषतः मुठा, मुळा व पवना नदी पात्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या