पुण्यात पावसाचा जोर वाढला, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, रेड अलर्ट जारी

गेल्या तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

प्रशासन व एनडीआरएफ पथके सज्ज असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे जुन्या पुण्यातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेषतः मुठा, मुळा व पवना नदी पात्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु