ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली पैसे लावायला भाग पाडणाऱ्या आणि मोठे आमिष दाखवणाऱ्या गेम्सवर बंदी ?


नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल २०२५’ नावाचे विधेयक सादर केले आहे. या विधेयकामुळे ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली पैसे लावायला भाग पाडणाऱ्या आणि मोठे आमिष दाखवणाऱ्या गेम्सवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. तसेच या गेम्सशी संबंधित यंत्रणेवर कारवाई होण्याचीही शक्यता आहे.


लोकसभेत केंद्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या ऑनलाईन रियल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालणाऱ्या विधेयकामुळे तपास अधिकाऱ्यांना कोणत्याही ठिकाणाची छापा टाकण्याचा आणि बेकायदा गेमिंग सुरू असल्याची शंका आल्यास संबंधित यंत्रणा चालवणाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. सरकारचा प्रयत्न विधेयकाद्वारे कौशल्यावर आधारित असलेल्या ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला प्रोत्साहन देणे हा आहे. त्याचवेळी पैसे लावायला भाग पाडणाऱ्या आणि मोठे आमिष दाखवणाऱ्या गेम्सवर बंदी घालणे हा पण सरकारचा हेतू दिसत आहे.


परिसर, इमारत, वाहन, संगणक संसाधन, व्हर्च्युअल डिजिटल स्पेस, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोरेज डिव्हाइस अशा कोणत्याही ठिकाणी जर प्रवेश नियंत्रण किंवा सुरक्षा कोड उपलब्ध नसेल, तर अधिकाऱ्याला संगणक संसाधने, वर्चुअल डिजिटल स्पेस, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा स्टोरेज डिव्हाइसवर प्रवेश मिळवण्यासाठी ओव्हरराइड करण्याचा अधिकार तपास पथकातील अधिकाऱ्यांना विधेयकाद्वारे देण्यात आला आहे. सरकारने पैसे लावायला भाग पाडणाऱ्या आणि मोठे आमिष दाखवणाऱ्या गेम्सशी संबंधित सेवा देणाऱ्यास तीन वर्षांची कैद आणि १ कोटी रुपयांचा दंड अशा स्वरुपाची कठोर शिक्षा देण्याची तरतूद विधेयकात केली आहे. यासोबतच, अशा खेळांची जाहिरात, प्रोत्साहन किंवा प्रायोजन करणाऱ्यांसाठी दोन वर्षांची कैद किंवा ५० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.


Comments
Add Comment

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या