लोकसभेत सादर झालेली ३ विधेयके काही मिनिटांत संयुक्त संसदीय समितीकडे


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू केला. या गोंधळातच अवघ्या काही मिनिटांत ही तिन्ही विधेयके सयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला.





भारतीय संविधानात १३० वी दुरुस्ती सुचविणारे विधेयक, केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक ही तीन विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणला.


सरकारने विधेयक आणून सुचविलेल्या १३० व्या दुरुस्तीनुसार पाच वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झालेल्या कोणत्याही मंत्र्याला (केंद्र किंवा राज्य) किमान ३० दिवस पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास तत्काळ पदमुक्त केले जाईल. यासाठी कोणाच्याही स्वतंत्र शिफारशीची आवश्यकता नसेल. या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला. काही विरोधी खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत आले. त्यांनी घोषणाबाजी केली. विधेयकाची सरकारी प्रत फाडली. काहींनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने फाडलेले कागद फेकले. अमित शाह यांनी सरकार ही तिन्ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे, असे म्हणत होते त्यावेळीही विरोधक गोंधळ घालत होते. विरोधकांचा भर कामकाज करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्याकडे असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले होते.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला