लोकसभेत सादर झालेली ३ विधेयके काही मिनिटांत संयुक्त संसदीय समितीकडे


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू केला. या गोंधळातच अवघ्या काही मिनिटांत ही तिन्ही विधेयके सयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला.





भारतीय संविधानात १३० वी दुरुस्ती सुचविणारे विधेयक, केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक ही तीन विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणला.


सरकारने विधेयक आणून सुचविलेल्या १३० व्या दुरुस्तीनुसार पाच वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झालेल्या कोणत्याही मंत्र्याला (केंद्र किंवा राज्य) किमान ३० दिवस पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास तत्काळ पदमुक्त केले जाईल. यासाठी कोणाच्याही स्वतंत्र शिफारशीची आवश्यकता नसेल. या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला. काही विरोधी खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत आले. त्यांनी घोषणाबाजी केली. विधेयकाची सरकारी प्रत फाडली. काहींनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने फाडलेले कागद फेकले. अमित शाह यांनी सरकार ही तिन्ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे, असे म्हणत होते त्यावेळीही विरोधक गोंधळ घालत होते. विरोधकांचा भर कामकाज करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्याकडे असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले होते.


Comments
Add Comment

Air India flight : सिंगापूर फ्लाइटमध्ये गोंधळ; २०० प्रवाशांना अचानक उतरवले विमानातून!

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात अजूनही ताजा असतानाच,

पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि

देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत

Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी गुरुवारी वाराणसीत मॉरिशसच्या पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या,

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी