आशिया कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची आज (१९ ऑगस्ट, २०२५) घोषणा होणार आहे. यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १८ ऑगस्टला विधान जारी केले आहे. मुंबईत मंगळवारी १९ ऑगस्टला वरिष्ठ पुरुष संघाची समिती बीसीसीआय मुख्यालयात पुरुष आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी बैठक घेतील.


बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. यात कर्णधार आणि निवड समितीच्या प्रमुखांचा समावेश असेल. भारतीय संघात १७ खेळाडूंना संधी मिळू शकते. जर १५ खेळाडूंची निवड झाली तर कोणाला संघात ठेवावे आणि कोणाला बाहेर बसवावे याबाबतचा निर्णय कठीण असणार आहे.


या वर्षीचा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असल्यामुळे खेळाडूंच्या निवडीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. भारताचे नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत हा संघ खेळणार असल्याने निवड समितीसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.



या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह:


शुभमन गिल: इंग्लंड दौऱ्यात कसोटी कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला शुभमन गिल टी-२० संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीच्या जोडीवर विश्वास दाखवू शकते.


मोहम्मद सिराज: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्यानंतरही मोहम्मद सिराजला टी-२० संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याचे टी-२० मधील अलीकडचे प्रदर्शन फारसे चांगले नाही. वेगवान गोलंदाजीच्या फळीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.


श्रेयस अय्यर: दुखापतीतून परतलेला आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर टी-२० संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.



गौतम गंभीरची भूमिका:


नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. निवड समितीच्या बैठकीत गंभीर काही खेळाडूंच्या समावेशासाठी आग्रही असू शकतात, असे मानले जाते. विशेषतः शुभमन गिलच्या निवडीसंदर्भात त्यांचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.


आशिया कपमध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.



आशिया कपसाठी भारताचा संभाव्य संघ


सूर्यकुमार यादव (कप्तान), अभिषेक शर्मा, संजू सैमसन, यशस्वी जायसवाल/शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जितेश शर्मा, हर्षित राणा, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे.

Comments
Add Comment

IPL 2026 MI vs SRH : वानखेडेवर मुंबईचा पुन्हा पराभव, हैदराबादचा दमदार ६ विकेट्सने विजय

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद ने मुंबई इंडियन्स ला ६ विकेट्सने पराभूत करत शानदार

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा