Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज, BMC सज्ज

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे शहरात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.





घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विशेषत: सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



आपत्ती व्यवस्थापन सज्ज, आपत्कालीन मदतीसाठी १९१६ हेल्पलाईन सुरू


बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचे सर्व उपाय केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाचा १९१६ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिका प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र

World Thalassemia Day : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, महापौर आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केले रक्तदान

रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड

BMC News : रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध; स्तनाचा कर्करोग पिडीत महिलांची धावपळ वाचेल

- शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण मुंबई (विशेष

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

- मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम ४४ तासांच्‍या प्रयत्‍नानंतर पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) जी दक्षिण विभागातील

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने