Mumbai Rain Update: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई:  हवामान खात्याने मुंबईतील मुसळधार पावसाबाबत दिलेला इशारा अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. मुंबईत धुंवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरातच थांबा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


मुंबई तसेच उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने मंगळवारीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या तीन ते चार तासांत मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा तसेच कॉलेजना सोमवारीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


बंगालचा उपसागरा कमी दाबाचे पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. हा पट्टा हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर मुंबईत कायम राहणार आहे. बुधवारपासून मुंबईतील पावसाचा जोर कमी होईल.


मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागांमध्ये पाणी भरू शकते.



रेल्वे रुळांवर पाणी


मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने लोकल वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
Comments
Add Comment

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल