Mumbai airport bust fire : मुंबई विमानतळावर इंडिगो बसला आग, अग्निशमन दलाचे त्वरित नियंत्रण

मुंबई : मुंबई विमानतळावर मंगळवारी (१९ ऑगस्ट) दुपारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याची घटना घडली. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही घटना विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनल टी-१ वर घडली. इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवासी बसच्या पुढील भागाला अचानक आग लागली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. विमानतळाच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच कारवाई झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे काही काळ विमानतळ परिसरात हलकासा गोंधळ उडाला होता.



अग्निशमन दलानं वेळीच विझवल्या ज्वाळा


दुपारी साधारण १२.३० च्या सुमारास टर्मिनल टी-१ वर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या बसच्या पुढील भागाला अचानक आग लागली. सुदैवाने, या बसमध्ये त्यावेळी कोणताही प्रवासी नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानतळावरील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा हवाई सेवांवर किंवा विमानांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.



मुंबई विमानतळावर इंडिगो बसला आग


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी घडलेल्या इंडिगो बसला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विमानतळावर इतर सर्व विमाने नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहिली. प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा न येता हवाई वाहतूक सुरू असल्याचा दिलासा विमानतळ प्रशासनाने दिला आहे. तथापि, या घटनेबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अद्याप सविस्तर आणि अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधीच, शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५) मुंबई विमानतळावर आणखी एक गंभीर प्रसंग टळला होता. इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A३२१ या विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला होता. सुदैवाने त्यावेळीही मोठा अपघात टळून प्रवासी सुखरूप राहिले होते.



सुरक्षित लँडिंगनंतर चौकशी सुरू


खराब हवामानामुळे इंडिगो एअरबस ए३२१ विमानाने मुंबई विमानतळावर कमी उंचीवर फिरण्याची प्रक्रिया केली, त्याच वेळी धावपट्टीवर एक आकस्मिक घटना घडली. मात्र, वैमानिकाने धैर्यपूर्वक विमान सुरक्षितपणे उतरवले, ज्यामुळे प्रवाशांना कोणतीही बाधा झाली नाही. एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर मानक प्रोटोकॉलनुसार चौकशी व दुरुस्ती प्रक्रिया केली जाईल. विमानास पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियामक परवानगी आवश्यक आहे. ही घटना विमानतळावर खराब हवामानामुळे घडलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका झालेला नाही.

Comments
Add Comment

हरित क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल : २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : (२५ मार्च) राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन

मिठीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पावले

तीन कामासाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५