वसई-विरारमध्ये पावसाचे थैमान, वसई ते विरार दरम्यान लोकल सेवा विस्कळीत; शहरात पूरस्थिती

विरार: वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला आहे. नालासोपारा येथे रुळांवर पाणी साचल्यामुळे आणि वसई रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.





सकाळपासून लोकल उशिराने धावत होत्या, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे ही सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली असून, प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.



या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अंतर्गत वाहतूकही ठप्प झाली असून, रस्ते जलमय झाले आहेत. वसई पूर्वेकडील भोयदापाडा आणि राजावळी येथील चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून सुमारे ३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.


हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन