वसई-विरारमध्ये पावसाचे थैमान, वसई ते विरार दरम्यान लोकल सेवा विस्कळीत; शहरात पूरस्थिती

विरार: वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला आहे. नालासोपारा येथे रुळांवर पाणी साचल्यामुळे आणि वसई रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.





सकाळपासून लोकल उशिराने धावत होत्या, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे ही सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली असून, प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.



या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अंतर्गत वाहतूकही ठप्प झाली असून, रस्ते जलमय झाले आहेत. वसई पूर्वेकडील भोयदापाडा आणि राजावळी येथील चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून सुमारे ३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.


हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे