Ratnagiri Rain: रत्नागिरीत मुसळधार पाऊस परिसरात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती, शेतकरी हवालदिल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख असलेल्या बावनदीने तर आपले पात्र ओलांडले असून, यामुळे वांद्री आणि उक्षी परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.


उक्षी मुस्लिम मोहल्ला आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे दोन्ही महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या पुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीत पुराचे पाणी आणि सोबत आलेला चिखल मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बावनदीची सध्याची पाणीपातळी ८.७७ मीटर एवढी आहे.


या पुरामुळे शेतीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी ; राज्य शासनाचा मोठा निर्णय

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेत कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

America Iran war : अमेरिका-इराण संघर्ष शिगेला : सलग सहाव्या रात्री इराणच्या नागरी सुविधांवर अमेरिकेचे जोरदार हल्ले, इराणकडूनही जशास तसे प्रत्युत्तर

वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात उडालेला भडका आता एका

Nashik Kumbhmela : नाशिकमधील ७० प्रमुख चौकांचा होणार कायापालट; वाहतूक होणार अधिक सुरक्षित

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी

State Examinations : राज्यातील सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

'टीईटी' पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : राज्यात

NCP : पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचे सुनेत्रा पवारांना पत्र

पटेल-तटकरे मुख्यमंत्री भेटीमागे हेच पत्र जबाबदार असल्याची