कौन बनेगा करोड़पती १७ : पहिल्या आठवड्यातच मिळाला करोडपती, आता प्रश्न ७ कोटींचा!

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा नवीन सीझन ११ ऑगस्टपासून सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात शोला पहिला करोडपती मिळाला आहे. याचा प्रोमो चॅनलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. केबीसी १७ चे पहिले करोडपती उत्तराखंडचे आदित्य कुमार आहेत.


आदित्य कुमार हे या सीझनचे पहिले करोडपती ठरले आहेत. विशेष म्हणजे ते ७ कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठीही प्रयत्न करणार आहेत. मात्र ते ७ कोटी जिंकतात का नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड प्रसारित होईपर्यंत थोडं वाट पाहावं लागेल. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या क्षणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


प्रोमोमध्ये आदित्य अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसतात. ते आपल्या कॉलेजच्या आठवणी शेअर करतात. त्यांनी सांगितले की एकदा कॉलेजच्या काळात त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितले होते की ते केबीसी साठी सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण आठवडा हा प्रँक केला.


आदित्य म्हणतात, “कॉलेजच्या दिवसांत मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की मी केबीसी साठी सिलेक्ट झालोय आणि लवकरच केबीसी टीम शूटसाठी येणार आहे. त्यामुळे सगळे सज्ज झाले. कुणी नवी पँट शिवून घेतली, कुणी नवी शर्ट. आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी विचारलं की कुणी आलं नाही का, तेव्हा मी सांगितलं की मी मजाक करत होतो.”


यानंतर आदित्य म्हणतात की यावेळी जेव्हा खरंच केबीसी चा कॉल आला, तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. जेव्हा त्यांना मेसेज दाखवला, तेव्हाच लोकांनी विश्वास ठेवला.


हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात, “पोहोचलेच नाही, खूपच वर पोहोचलात आपण.” पुढे आदित्य अमिताभ बच्चन यांना म्हणतात, “सर, विश्वास बसत नाही.” यावर बिग बी उत्तर देतात, “आपण वरपर्यंत जाणार, ७ कोटींपर्यंत.”आता आदित्य हे ७ कोटींचा प्रश्न खेळून जोखीम घेणार आहेत. ते जिंकतात का नाही, हे पाहणं खूप रोचक ठरणार आहे.

Comments
Add Comment

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर