जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, एवढे मृत्यू

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरातील घाटी गावात आणि जवळच्या दोन ठिकाणी ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे घाटी गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

घटनास्थळावरुन आतापर्यंत ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त घटनास्थळावरुन सहा जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या एका भीषण घटनेत ६० हून अधिक जणांचा जीव गेला होता.

कठुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बगड आणि चांग्रा गावांमध्ये आणि लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे आणि उझ नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लोकांना जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू