जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, एवढे मृत्यू

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरातील घाटी गावात आणि जवळच्या दोन ठिकाणी ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे घाटी गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

घटनास्थळावरुन आतापर्यंत ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त घटनास्थळावरुन सहा जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या एका भीषण घटनेत ६० हून अधिक जणांचा जीव गेला होता.

कठुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बगड आणि चांग्रा गावांमध्ये आणि लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे आणि उझ नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लोकांना जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,